'चांभार गोंदा' नावाचा इतिहास काय आहे?

हल्लीचे श्रीगोंदा म्हणजे या शहराची पूर्वी चांभारगोंदा अशी ओळख होती. 

त्याचे कारण आहे याचे श्रीगोंदा शहरात सरस्वती नदीच्या तीरावर संत रविदास महाराज यांची समाधी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी शेख महमंद बाबा यांच्या आचरणाने प्रभावित होवून त्यांना चांभारगोंदा (श्रीगोंदा) गावी आणले त्या काळी श्रीगोंदा उत्तर वेस,बाजारतळ वेस,काळकाई चौकातील वेस व छत्रपती शिवाजी चौकातील वेस अशा या चार वेशीमध्ये श्रीगोंदा गाव वसलले होते.

मालोजीराजे भोसले यांनी श्रीगोंदा गावाजवळच शेख महंमद बाबांना जागा दिली.शेख महंमद बाबा यांनी आपल्या जीवनात आखील मानव जातीला आपल्या सुश्राव्य प्रवचनाद्वारे उत्तम आचारणाद्वारे माणुसकीचा धर्म शिकविला परमेश्वर एकच असुन सर्व त्यांचे भक्त आहेत.माणसाने माणसाला मदत करून त्यांच्या सुख-दुखःत सहभागी होवून आपले जीवन जगावे हाच संदेश त्यांनी दिला.

त्यांच्या आचरणामुळे त्यांना दैवी शक्ती प्राप्त होऊन ते पंचक्रोशीत सुपरिचीत झाले.

जीतीभेद त्यांना माहित नव्हात. संत गोंविद महाराज,राऊळबुवा महाराज,प्रल्हाद महाराज व गोदड महाराज यांनी देखील हाच संदेश दिल्याने पिढ्यानपिढ्या त्यांचे नाव घेतले जाते.

शेख महंमद बाबा औरंगाबाद येथील दौलताबाद व खुलताबाद या गावी राहिले त्या ठिकाणी त्यांचे मुुर्शिद (गुरू)कादरी चॉंद साहेब यांच्या सोबतीत त्यांना आध्यात्मिक शिक्षण मिळाले.धार्मिक व आध्यात्मिक पारंगत झाले.दररोज चिंतन,मनन,पठण,करणे अशी त्यांची दिनचर्या होती.ते गृहस्थाश्रमी होते.संसार चालवून त्यांनी आपली परमार्थाची साधना उत्कुष्ठपणे साधून दाखविली.श्रीगोंदा येथे त्यांच्या पत्नीची कबरही त्यांच्या शेजारी लागूनच एकाच दर्ग्यात आहे.

शेख महंमद बाबा यांचे गुरू मुर्शिद कादरी चॉंद साहेब (चॉंद बोधले) हे निजाम शाहीतील प्रभावशाली साधू पुरूष होते.त्यांची समाधी आजही दर्ग्याच्या स्वरूपात देवगिरीच्या पायथ्याशी औंरगाबाद वेरूळ मार्गाच्या उजव्या बाजुस आहे.

स्त्रोत :: श्रीगोंद्याचे सूफी संत शेख महमद बाबा....

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे